भगवा रंग सोड​ला त्यांना लखलाभो, श्रीकांत शिंदेचा​, उद्धव ठाकरेंना टोला

Santosh Gaikwad March 25, 2024 07:19 PM



​मुंबई :
ठाण्याच्या टेंभी नाका येथे धुळवडीचा उत्सव सुरू केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी धुळवडीच्या आनंद लुटला.यावेळी श्री श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले, आज धुळवडीच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज सगळेजण वेगवेगळ्या रंगात रंगले आहेत. एका रंगात भारत रंगला आहे तो म्हणजे भगवा रंग. भगव्या रंगात लोक रंगून गेले आहेत. धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. रुसवे-फुगवे बाजूला ठेवण्याचा आजचा दिवस. एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे खेळली पाहिजे. विरोधक सत्ताधारीही या दिवशी एकत्र येतात. कटुता दूर करणारा हा सण आहे. काही लोकांनी भगवा रंग सोडला आहे. ज्यांनी भगवा रंग सोडून जो रंग धारण केला आहे तो त्यांना लखलाभ असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरेंचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग, प्रभू रामाचा भगवा रंग पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहोत. असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातल्या टेंभी नाका भागात जाऊन होळीचा आनंद लुटला. मुख्यमंत्री म्हणाले, धुळवडीचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस राजकारण करण्याचा दिवस नाही. महाराष्ट्राच्या जनतेला धुळवडीच्या शुभेच्छा देत आहोत. राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य आणि केंद्र सरकार मिळून महाराष्ट्राचा विकास करतो आहोत. रासायनिक रंगांचा वापर करुन होळी खेळू नका असंही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं.