(मिलिंद काटे)
छत्रपती संभाजीनगर : आजकाल सर्वांनाच सरकारी नोकर्या हव्या आहेत. साधं शिपायाच्या पदासाठी लोक लाखो रुपये द्यायला तयार होतात. शिक्षक व्हायचं असेल तर संस्थाचालकाला पस्तीस लाख रुपये द्यावे लागतात. कॉलेजवर प्राध्यापक व्हायचं असेल तर पन्नास ते साठ लाख रुपये द्यावे लागतात. कारण भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण लक्षणीय आहे. सरकारी नोकरीतून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळणारा प्रचंड पैसा किंवा विविध विभागातील प्रशासकीय अधिकार्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गोळा केलेली अवैध माया बघून अनेक तरुण आणि तरुणी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.
महाराष्ट्र सरकार भ्रष्ट अधिकार्यांवर कोणतीही कारवाई करत नाही हे लक्षात आल्यानंतर महत्वकांक्षी तरुण-तरुणी सरकारी अधिकारी होऊन बक्कळ कमाई करण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे घराघरातून बहुतेक सर्वच ‘लेकरे' मोठा साहेब होण्यासाठी रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव सारख्या खेडेगावातील एक इंजिनियर तरुण सरकारी नोकरी करायची नाही. भ्रष्टाचार करायचा नाही. आपल्या स्वतंत्र उद्योग व्यवसायाच्या कल्पनेला कुंपण घालायचं नाही, या स्वप्नाने पछाडला जातो. कारण कष्टाने मिळालेल्या भाकरीत रात्रीच्या निवांत झोपेचं आश्वासन असतं, यावर त्याचा ठाम विश्वास असतो. म्हणूनच तो नोकरीवर लाथ मारून तेला तुपाचा उद्योग सुरू करतो. आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात गरुडभरारी घेतो. समाजातील लाखो हजारो बेरोजगार तरुण-तरुणींच्या पुढे एक आदर्श निर्माण करतो. नोकर्या चाकर्या करण्यापेक्षा स्वतः मालक व्हा. इतरांना रोजगार उपलब्ध करून द्या, असा संदेश हरी नागे आजच्या तरुण पिढीला देत आहे. ‘विश्वनाथाय ऑर्गानिक्स 'या रजिस्टर्ड उद्योगाअंतर्गत ऑर्घाणीका सात्विक (ध्rुप्aहग्म्a एaूून्ग्म्) या ब्रँड च्या नावाने शुद्ध सात्विक लाकडी घाण्याचे तेल, गायीचे म्हशीचे व गीर गायीचे अत्यंत स्निग्ध आणि मौल्यवान तूप विक्री केली जाते.
काही वर्षांपूर्वी स्वतःच्या उद्योग व्यवसायांच्या कल्पनेने झपाटलेल्या बोकुड जळगाव येथील हरी नागे या महत्वकांक्षी तरुणाने कॉर्पोरेट मधली नोकरी सोडून गावी येऊन कृषी वर आधारित उद्योग करण्याचे ठरवले, व त्यानुसार १ जानेवारी २०२४ पासून या उद्योगाची सुरुवात केली आहे.
त्या आधी खादी ग्रामोद्योग चे ग्रामीण तेल उद्योगाचे सखोल प्रशिक्षण, १ वर्षे मार्केट रिसर्च करून, ग्राहकांची मागणी, चांगल्या तेलबिया व दुधाच्या पदार्थांचा स्त्रोत शोधून, त्यावर स्वतः काम करून, मगच उद्योगाला सुरुवात केली.
तेलबिया या करडई आणि सूर्यफूल लातूर, धाराशिव, तसे कर्नाटकातील बिदर, बेल्लारी भागातून मागवली जाते, शेंगदाणा हा गुजरात मधून मागवला जातो. तीळ मध्य प्रदेश मधून आणला जातो. कल्याण शहापूर येथे गिर गायीची मोठी गोशाळा असून देशी गायीच्या व म्हशीच्या तुपाचे उत्पादन हे दुधाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या चाळीसगांव येथील नावाजलेल्या व जुन्या हेमराज डेअरी येथे होते.
गीर गायीचे तूप हे मुक्त चरणार्या गायी, कुठलेही हार्मोनल वाढीसाठी इंजेक्शन नसलेले, सेंद्रिय चारा व डोंगरात चरणार्या गायीच्या दुधापासूनच वैदिक बिलोना पद्धतीने बनवलेले A२ गीर गायीचे तूप आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र शासन व महानगर पालिका अंतर्गत आयोजित श्री स्वामी समर्थ शेतकरी आठवडी बाजार येथे स्टॉल, व संपूर्ण शहरात होम डिलिव्हरी, व महाराष्ट्रात कुरिअर देखील केले. अग्रसेन टाईमचे मुख्य संपादक माननीय अरुणकुमार मुंदडा यांनी पैठण तालुक्यातील हरी नागे या इंजिनीयर तरुणाच्या कर्तृत्वाचे, धडाडीचे आणि त्याच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील उद्योजकीय मनांना उभारी आणि प्रोत्साहन देण्याचं कार्य ज्येष्ठ पत्रकार या नात्याने अरुणकुमारजी नेहमी करत असतात.
तरुण उद्योजक हरी नागे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र शासन व महानगरपालिका अंतर्गत आयोजित श्री स्वामी समर्थ शेतकरी आठवडी बाजार परिसरात त्यांच्या प्रसिद्ध तेलातुपाच्या उद्योगाचा स्टॉल लावलेला आहे. मालाच्या उत्कृष्ट आणि दर्जेदार गुणवत्तेमुळे ग्राहकांची मागणी वाढत आहे. प्रामाणिकपणा आणि विश्वास या जोरावर इंजिनियर नागे यांनी छत्रपती संभाजी नगरात आपला स्वतःचा ग्राहक वर्ग तयार केला आहे. त्यांच्या संभाजीनगर आतील स्टॉलला जेष्ठ पत्रकार अरुण कुमार यांनी सहकुटुंब भेट दिली. याप्रसंगी त्यांनी त्यांच्या उत्पादनाची सखोल माहिती घेतली. याप्रसंगी मुंदडा यांनी मालाच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचा सल्ला उद्योजकांना दिला.