पाकिस्तान ही सांगेल खरी शिवसेना कोणाची ? पण निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय : उद्धव ठाकरेंची टीका

Santosh Gaikwad April 24, 2023 01:29 AM


जळगाव : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगाव वाद जंगी सभा पार पडली या सभेत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले सगळा जल्लोष बघितल्यावर शिवसेना कुणाची?  हे दिसतयं!  पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची, पण निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय अशी टीका ठाकरे यांनी केली.

ठाकरे पुढे म्हणाले की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र बघतोय. काही जणांना वाटले तेच शिवसेना पण अश्या अनेक घुशी आम्ही बघितल्या आणि निवडणुकीत आपटल्या. आज खरच तात्यांची उणीव भासते, ४० गद्दार गेले तरी फरक पडत नाही पण एक निष्ठावंत गेले की उणीव जाणवते. तात्यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागेल असे वाटले नाही. अशी खंत ठाकरे आणि व्यक्त केली


भाजप व टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की,भाजप हे आव्हान नाही, पण ते सत्तेवर आहेत त्या दरम्यान जे नुकसान होईल ते दूर कसे करायचे ते आव्हान आहे.

सत्यपाल मलिक यांनी पुलवामाचे सत्य सांगितले. काश्मीर बद्दल बोलले आता त्यांच्या मागे सीबीआय लावली. पुन्हा काश्मीरात जवान मारले गेले पण अमित शहा निवडणुक प्रचारात कर्नाटकात. मलिक यांना काही बोलू नका म्हणून सांगितले. काही लोक लाचारी म्हणून तुमच्याकडे येतात. मग तुम्ही काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडता. यांना भारत मातेचे कुठलेही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे अशी टीका ठाकरे यांनी केली.घ राणेशाहीत पण एक परंपरा असते. तुम्ही म्हणता फकीर पण तुम्ही निघून जाल पण जनतेचे काय? असा सवाल करीत नाव न घेता पंतप्रधानांना लक्ष्य केलं.