*प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मन की बात हा उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

Santosh Gaikwad April 30, 2023 06:09 PM


मुंबई -  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला मन की बात हा आकाशवाणी वरील उपक्रम जगभरातील अनोखा आदर्श  उपक्रम आहे. जगभर मन की बात चा प्रभाव आहे. कोटयावधी भारतीय दरवेळी मन की बात  ऐकतात. मन की बात हा उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या  मन की बातचा  आज 100 वा भाग आकाशवाणीवर प्रसारीत करण्यात आला त्याचे श्रवण हरियाणा येथील कर्नाल मधील शासकीय गेस्ट हाऊसवर  रामदास आठवले यांनी केले. आज संपूर्ण देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मन की बात चा शतक महोत्सव साजरा केला. कोटयावधी भारतीयांनी मन की बात चे श्रवण केले.


 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 ऑक्टोंबर 2014 रोजी मन की बात चा प्रारंभ केला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रधानमंत्री मन की बात आकाशवाणीवरुन प्रसारित करतात. त्याचा आज 100 वा भाग देशाने शतक महोत्सव म्हणुन साजरा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधुन स्वच्छ भारत अभियान; बेटी बचाव बेटी पढाव अभियान , मेक इन इंडिया अभियान अशा अनेक अभियानांचा प्रचार केला. निसर्गावर प्रेम करा पर्यावरण वाचवा ; स्त्री शिक्षण ; ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या अशा अनेक विषयांवर त्यांनी देशाला मार्गदर्शन केले. देशाच्या विकासासाठी मन की बात मधुन त्यांनी देशवासीयांना मार्गदर्शन केले. देशातील अशा अनेक शुरवीर कला निपुण असणा-या विविध प्रांतातील प्रसिध्दीपासुन दुर असणा-या लोकांना मन की बात मधुन त्यांचा उल्लेख करुन त्यांना प्रकाशझोतात आणले  त्याचा अनेकांना फायदा झाला. मन की बात ने अनेक इतिहास घडविले आणि जगातला हा अनोखा उपक्रम संपूर्ण जगाने आज गौरविला आहे. युनोच्या कार्यालयातही आज मन की बात चे श्रवण करण्यात आले. अनेक नविन उपक्रम आणणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जगातले प्रथम क्रमांकाचे नेते ठरले आहेत. त्यांनी सुरु केलेला मन की बात हा उपक्रम जगाने सुध्दा गौरविला आहे.  प्रधानमंत्री मोदींच्या मन की बात या उपक्रमाची इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात उपक्रमाची भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल असे  रामदास आठवले यावेळी म्हणाले.