अर्जुन तेंडुलकरने गेल्या सामन्यातील एकाच षटकात ३१ धावा दिल्या; मंगळवारी होणाऱ्या सामन्यात त्याला संधी मिळणार...?

SANTOSH SAKPAL April 24, 2023 09:47 PM

मुंबई : अर्जुन तेंडुलकरने पहिल्या दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी केली होती. पण तिसऱ्या षटकात मात्र त्याच्या एका षटकात ३१ धावा गेल्या आणि तो ट्रोल व्हायला लागला. पण आता मंगळवारी मुंबईचा पुढचा सामना गुजरात टायटन्सबरोबर होणार आहे. पण या सामन्यात अर्जुनला संधी मिळणार की नाही, याचे संकेत आता मिळाले आहेत.

पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला एकाच ओव्हरमध्ये तब्बल ३१ धावा पडल्या. दोन षटकं त्याने चांगली टाकली होती पण तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र त्याची चांगलीच धुलाई झाली. हे मुंबईसाठी १६ वे षटक होते. या षटकात चौकार षटकारांचा पाऊस पडला. त्यामुळे चांगली फलंदाजी केल्यानंतरही मुंबईला मॅच गमवावी लागली. वानखेडेवर मॅच हरल्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते देखील नाराज झाले आणि त्यांनी पराभवाचं खापर अर्जुन तेंडुलकरवर फोडलं. काहींनी तर मीम्सच्या माध्यमातून त्याची फिरकी देखील घेतली. आता मुंबई पुढची मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. पण त्या मॅचपूर्वीच अर्जुनला आता पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात अर्जुनला संधी द्यायची की नाही, याबाबत मुंबई इंडियन्सने आपले मत बनवले आहे.

अर्जुन तेंडुलकरने हैदराबादविरुद्धचे अखेरचे षटक फारच चांगले टाकले होते. कारण या अखेरच्या षटकात दोन बळी मिळवले होते. या षटकात अर्जुनने आपला पहिला बळी मिळवला होता आणि संघधाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे त्याची ती गोलंदाजी अजूनही मुंबईच्या लक्षात आहे. पंजाबविरुद्धच्या एका सामन्यात ३१ धावा गेल्या, हे मान्य असले तरी एखादे षटक हे वाईट पडू शकते. त्यामुळे आता गुजरातविरुद्धच्या सामन्याचत मात्र अर्जुनला संधी मिळणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अर्जुनचे हे पहिलेच आयपीएल आहे, त्यामुळे सध्याच्या घडीला तो शिकत आहे. त्यामुळे फक्त एका षटकावरून त्याला संघाबाहेर काढले जाणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता पुढच्या सामन्यातही अर्जुनला संधी मिळणार आहे.